Friday, July 14, 2006

कधी कधी आपली खुप इच्छा असते , छान काही तरी बोलायची....
पण शब्द साथ देत नाहीत..
कधी कधी आपली खुप इच्छा असते , कोणाला तरी चांगलच झापायची....
पण तरीही शब्द साथ देत नाहीत..
मग नेहेमी अशा नालायक शब्दांवर विसंबुन रहाण्यात काय अर्थ आहे?
बोलु देत ना कधीतरी.. डोळ्यांनाच डोळ्यांशी....

----आनंद----

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

तिच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती..
दोघंही होतो आनंदात..

तिच्या आयुष्यात गुंतलेली ती, माझ्या आयुष्यात गुंतलेलो मी..
ह्याही गोष्टीचा विसर पडलेला की..
तिचं-माझं नसुन, हे आमचं आयुष्य होतं कधी तरी..

चुक कोणाचीच नव्हती पण बरोबर पण कोणीच नव्ह्तं..
जीवनाच्या जमा खर्चात, शिल्लक काहीच उरलं नव्ह्तं..

कोणी आधी सुरुवात केली आणि कोणी केल शेवट..
स्वप्नातल्या घराच्या वाटेवरुन नक्की कोण गेलं भरकटत?

एकाच रस्ता चुकला तरी, दुसरा त्याला शोधत जाई..
त्या दिवसांची आठवण, डोळ्यात टचकन पाणी घेउन येई..

पण आता सगळं संपलं होतं, कुणाचंच दुसर्यावाचुन काहीच अडलं नव्हतं..
एकमेकांना विसरण हे कधी इतकही सोपं कसं होऊ शकतं?
हा प्रश्न पडला मला...

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

----आनंद----